Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Vijay Wadettiwar: ‘मुंबईला गुजरातच्या दावणीला बांधण्याचे कटकारस्थान…’; वडेट्टीवारांचा महायुतीवर निशाणा

Vijay Wadettiwar: ‘मुंबईला गुजरातच्या दावणीला बांधण्याचे कटकारस्थान…’; वडेट्टीवारांचा महायुतीवर निशाणा

Vijay Wadettiwar : मुंबईवर सध्या चौफेर आक्रमण सुरू असून, शहराची जमीन हडपून ती गुजरातच्या दावणीला बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईचे अस्तित्व आणि मराठी अस्मिता वाचवण्यासाठी आता एकत्र येऊन लढण्याची वेळ आली आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महायुती सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली.

ठाकरे बंधूंच्या युतीला शुभेच्छा, पण…

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीवर भाष्य करताना वडेट्टीवार म्हणाले की, दोन भाऊ आणि एक कुटुंब पुन्हा एकत्र येत असेल, तर त्याचा आम्हाला आनंदच आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या गणितावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, काँग्रेसची तयारी ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षासोबत महाविकास आघाडी म्हणून लढण्याची होती. मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेसची कोणतीही भूमिका नसल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

हेही वाचा – ‘रशिया-युक्रेन युतीसारखं चित्र उभं करू नका…’; मुख्यमंत्र्यांची ठाकरे बंधूंच्या युतीवर खोचक टीका

‘मविआ’ किंवा ‘इंडिया’ आघाडीला धक्का नाही

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मित्रपक्ष स्वतंत्रपणे लढत असल्याच्या चर्चांवर वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिले. लोकसभा आणि विधानसभेच्या आघाड्या वेगळ्या असतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या पातळीवर लढल्या जातात. तिथे स्थानिक गणिते महत्त्वाची असतात. त्यामुळे मित्रपक्ष वेगवेगळे लढले तरी त्याचा ‘इंडिया’ आघाडी किंवा ‘महाविकास आघाडी’च्या एकजुटीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संविधान आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक

काँग्रेसच्या विचारधारेचा पुनरुच्चार करताना वडेट्टीवार म्हणाले की, काँग्रेस हा पक्ष जात किंवा धर्माचे राजकारण करत नाही. आम्ही केवळ संविधान आणि सर्वसमावेशक विकासावर विश्वास ठेवतो. मुंबईतील लूट थांबवण्यासाठी आणि प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी जनता काँग्रेसच्या पाठीशी उभी राहील.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!