Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

इंदापूरमध्ये नव्या औद्योगिक पर्वाची सुरुवात, रत्नपुरी मळ्यात साकारणार नवी ‘MIDC’; अजितदादांचं स्वप्न साकार

इंदापूरमध्ये नव्या औद्योगिक पर्वाची सुरुवात, रत्नपुरी मळ्यात साकारणार नवी ‘MIDC’; अजितदादांचं स्वप्न साकार

Indapur MIDC News : इंदापूर तालुक्यातील औद्योगिक विकासाला आज एक ऐतिहासिक दिशा मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या रत्नपुरी मळ्यातील तब्बल 1,000 एकर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (MIDC) हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे इंदापूरमध्ये नवीन औद्योगिक वसाहतीचा मार्ग अधिकृतपणे मोकळा झाला असून, तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

दिवंगत अजित पवारांचे स्वप्न सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत साकार
इंदापूर तालुक्यासाठी स्वतंत्र आणि भव्य औद्योगिक वसाहत असावी, हे स्वप्न दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहिले होते. त्यासाठी त्यांनी सातत्याने प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा केला होता. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. इंदापूरचे आमदार तथा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही या प्रकल्पासाठी दिवंगत अजित पवार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता, ज्याला आता यश आले आहे.

हेही वाचा – Cabinet Decisions: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय! आता अजितदादांच्या अपूर्ण राहिलेल्या ‘या’ इच्छा पूर्ण होणार

हजारो युवकांना मिळणार रोजगाराच्या संधी
या नवीन ‘एमआयडीसी’मुळे केवळ इंदापूरच नव्हे, तर बारामती आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यातील औद्योगिक गुंतवणुकीला मोठी गती मिळणार आहे. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे हजारो स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच, स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ प्राप्त होणार आहे. मोठ्या कंपन्यांनी इंदापूरमध्ये गुंतवणूक केल्यास हा तालुका भविष्यात जिल्ह्याचा औद्योगिक केंद्रबिंदू ठरेल.

इंदापूर ठरणार उद्योगांचे नवीन ‘हब’
रत्नपुरी मळ्यातील ही जमीन मोक्याच्या ठिकाणी असल्याने उद्योगांसाठी ती अत्यंत पोषक ठरणार आहे. औद्योगिक विकासाच्या दिशेने महाराष्ट्राने गाठलेला हा एक निर्णायक टप्पा मानला जात आहे. या निर्णयाबद्दल संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, इंदापूर लवकरच नव्या उद्योगांचा केंद्रबिंदू म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!