Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nashik Accident: दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला! नाशिकमध्ये दोन कारच्या भीषण धडकेत चौघांचा जागीच अंत

Nashik Accident: दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला! नाशिकमध्ये दोन कारच्या भीषण धडकेत चौघांचा जागीच अंत

Nashik Accident: नाशिक जिल्ह्यामध्ये भीषण रस्ते अपघातांची मालिका सुरूच असून, नाशिक-पेठ राष्ट्रीय महामार्गावरील आंबेगन शिवारात काल दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या दुर्घटनेत चार प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य ६ ते ७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. शिर्डीहून साईबाबांचे दर्शन घेऊन नाशिकमार्गे गुजरातच्या वापीकडे जात असताना, चाचडगाव टोलनाका ओलांडल्यावर हा भीषण अपघात घडला. धडक इतकी वेगवान होती की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

चार महिलांची प्रकृती चिंताजनक

या घटनेतील जखमींना तातडीने नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, जखमींमध्ये चार महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. मृतदेह शवविच्छेदनासाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून, या अपघातामुळे संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा – Buldhana Accident: शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी

दुसरीकडे, जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसांत झालेल्या इतर दोन अपघातांनी नाशिककरांना हादरवून सोडले आहे. राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्यावर उंबेरे गावाजवळ एका रिक्षा आणि मिनीबसची समोरासमोर धडक झाली. यामध्ये इगतपुरी तालुक्यातील गिरणारे येथील दीपक डावखर, आकाश डावखर आणि दीपक जाधव या २२ वर्षीय तीन तरुणांचा जागीच अंत झाला. हे तरुण पालखी घेऊन शिर्डीला गेले होते आणि तिथून दर्शनासाठी शनिशिंगणापूरला जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. तसेच, सटाण्याजवळील ढोलबारे येथे झालेल्या अन्य एका अपघातात नवापूरमधील एका दांपत्याला आपला प्राण गमवावा लागला. एकामागून एक घडणाऱ्या या भीषण दुर्घटनांमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!