Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Mahesh Manjrekar: ‘मुंबईकर म्हणून घराबाहेर पडताना मला लाज वाटते…’; ठाकरे बंधूंसमोर महेश मांजरेकर असं का म्हणाले?

Mahesh Manjrekar: ‘मुंबईकर म्हणून घराबाहेर पडताना मला लाज वाटते…’; ठाकरे बंधूंसमोर महेश मांजरेकर असं का म्हणाले?

Mahesh Manjrekar: मुंबईच्या विदारक स्थितीवर बोट ठेवत सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आपली तीव्र अस्वस्थता व्यक्त केली आहे. जर एखादा चांगला पर्याय उपलब्ध झाला, तर मी तत्काळ मुंबई सोडून जाईन, अशा शब्दांत त्यांनी या महानगरातील ढासळत्या जीवनमानावर प्रहार केला. मुंबईतील हवेची गुणवत्ता आणि अनियंत्रित गर्दीमुळे सामान्य नागरिकांचे जगणे असह्य झाल्याचे सांगताना मांजरेकर म्हणाले की, आज शहराबाहेर पडताना एक मुंबईकर म्हणून आपल्याला लाज वाटते. श्वासावाटे आपण ऑक्सिजनऐवजी विषारी वायू ओढत असून एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 183 वर पोहोचल्याने शारीरिक व्याधी वाढत आहेत. एखाद्या फुग्यात क्षमतेपेक्षा जास्त हवा भरल्यानंतर जी स्थिती होते, तशीच काहीशी अवस्था आज 2 कोटी 31 लाख लोकसंख्या असलेल्या मुंबईची झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर टीकास्त्र

मांजरेकर यांच्या या रोखठोक प्रश्नावर भाष्य करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर टीकास्त्र सोडले. मुंबईत विकासाच्या नावाखाली सुरू असलेली धावपळ ही प्रगती नसून विनाशाची नांदी असल्याचा आरोप त्यांनी केला. नियोजनाचा अभाव आणि केवळ जाहिरातबाजीसाठी सुरू असलेल्या कामांमुळेच मुंबईची हवा इतकी प्रदूषित झाली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – Thackeray Brothers Joint Interview: ‘भ्रष्टाचाराबद्दल फडणवीसांनी बोलूच नये…’; राज ठाकरेंची घणाघाती टीका, संयुक्त मुलाखतीचा प्रोमो व्हायरल

दरम्यान, मुंबईला आता नवीन सिमेंट-काँक्रीटच्या विकासाची गरज नसून हे शहर गर्दीमुक्त करण्याची आवश्यकता असल्याचे मांजरेकर यांनी ठामपणे सांगितले. बाहेरून येणारे लोंढे थांबवून मुंबईचे मूळ सौंदर्य आणि आरोग्य जपण्याचे आवाहन त्यांनी या मुलाखतीद्वारे केले आहे. या संवादानंतर आता ठाकरे बंधू मुंबईच्या या मूलभूत प्रश्नांवर भविष्यात कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!