Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Municipal Elections: महापालिका निवडणुकीच्या तारखेबाबत मोठी अपडेट! कधीपासून लागणार आचारसंहिता?

Municipal Elections: महापालिका निवडणुकीच्या तारखेबाबत मोठी अपडेट! कधीपासून लागणार आचारसंहिता?

Municipal Elections Date: राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 20 डिसेंबरला होणार असून, दोन्ही टप्प्यांचे निकाल 21 डिसेंबरला जाहीर केले जातील. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील मतमोजणी 3 डिसेंबरला होणार होती, परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे ती पुढे ढकलण्यात आली.

टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार महापालिका निवडणुका

याच पार्श्वभूमीवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आणखी एक महत्त्वाची घोषणा समोर आली आहे. नगर परिषद व नगर पंचायत प्रक्रियेचा समारोप अद्याप झालेला नसतानाच महानगर पालिकांच्या निवडणुकांचे वेळापत्रक निश्चित झाले आहे. राज्यात महापालिका निवडणुका 15 डिसेंबरपासून टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत. प्रथम ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील मनपांची निवडणूक होईल, त्यानंतर ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील महापालिका निवडणुका पार पडतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही  वाचा – मनपाच्या 72 पैकी 18 थकबाकीदारांनी भरले 50 लाख ! फेरलिलाव प्रक्रिया राबविण्यासाठी कर विभागाकडून नियोजन

15 डिसेंबरपासून राज्यात आचारसंहिता लागू होणार

विशेष म्हणजे, मुंबई, ठाणे आणि पुण्यासारख्या प्रमुख महानगर पालिकांच्या निवडणुका एकाच कालावधीत घेण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. त्यामुळे 15 डिसेंबरपासून राज्यात आचारसंहिता लागू होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पूर्वी निवडणूक आयोगाने महानगर पालिका निवडणुका सर्वांत शेवटी घेण्याचे संकेत दिले होते. मात्र, आता नगर परिषद आणि नगर पंचायत मतमोजणीनंतर थेट महानगर पालिकांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय पुढे आला आहे. परिणामी, राज्यातील सर्व मोठ्या महापालिका ताब्यात घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. विशेषकरून मुंबई महानगर पालिकेची निवडणूक यंदाही सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. यावेळी ठाकरे बंधू एकत्र आल्याचे चित्र दिसत असल्याने ही निवडणूक अधिकच रोचक आणि चुरशीची होणार आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!