Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Gunratan Sadavarte : मोठी बातमी..! राज्य सरकारच्या निर्णयावर आक्षेप, गुणरत्न सदावर्तेंचा कोर्टात जाण्याचा इशारा

Gunratan Sadavarte : मोठी बातमी..! राज्य सरकारच्या निर्णयावर आक्षेप, गुणरत्न सदावर्तेंचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाने विजय मिळवला असा वाटत असताना, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारच्या निर्णयावर कडक आक्षेप घेतला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या ५ दिवसांच्या आमरण उपोषणानंतर सरकारने मागण्या मान्य केल्या आणि हैदराबाद गॅझेटचा जीआर हाती दिल्यानंतर उपोषण मागे घेतले.

मात्र, सदावर्ते यांनी याला ‘लॉलिपॉप’ म्हणून हिणवले असून, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयावर कोर्टात जाणार असल्याचे जाहीर केले आहे. ‘पोलिसांना मारहाण केलेल्या गुन्ह्यांना न्यायालयाची परवानगी लागते, ते सरकार एकतर्फी मागे घेऊ शकत नाही,’ असा इशारा देत सदावर्ते यांनी मराठा नेत्यांना प्रतिवादी करण्याची धमकी दिली आहे. या घडामोडींमुळे मराठा आरक्षणाच्या ‘विजयावर’ नवीन वाद सुरू झाला आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर ५ दिवसांचे आमरण उपोषण केले होते. ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण द्या, हैदराबाद गॅझेट लागू करा, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, अशा प्रमुख मागण्यांसाठी हे उपोषण होते.

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आझाद मैदानावर जाऊन जरांगे यांची भेट घेतली आणि सरकारने सर्व मागण्या मान्य केल्याचे सांगितले. यासंदर्भातील मसुदा देखील हाती दिला गेला. यात मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा मुद्दाही समाविष्ट आहे. हैदराबाद गॅझेटचा जीआर मिळाल्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेतले आणि विजयाची घोषणा केली. मात्र, हा ‘विजय’ अद्याप संशयास्पद झाला आहे.

‘लॉलिपॉप’ देऊन फसवलं, गुन्हे मागे घेणं बेकायदेशीर

अॅड. गुणरत्न सदावर्ते, जे मराठा आरक्षणाच्या विरोधात नेहमीच सक्रिय असतात, यांनी सरकारच्या निर्णयावर थेट आक्षेप घेतला. ते म्हणाले, “मनोज जरांगे यांना लॉलिपॉप मिळाला आहे. सरकारने फक्त दिखावा केला आहे.” विशेषतः मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयावर सदावर्ते यांनी कडाडून टीका केली. ते म्हणाले, “जर मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले गेले, तर मी कोर्टात जाईन. आंदोलनादरम्यान अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांना मारहाण झाली होती. अशा गुन्ह्यांना न्यायालयाची परवानगी लागते. सरकार एकतर्फी मागे घेऊ शकत नाही. पोलिसाचा मुलगा म्हणून मी सांगतो की, पोलिसांना मारहाण केलेले गुन्हे मागे घेतले जाऊ शकत नाहीत.”

सदावर्ते यांनी पुढे स्पष्ट केले, “जरांगे आणि मराठा लीडरशिपमुळे मारहाण केलेले गुन्हे मागे घेतले गेले, तर मी कोर्टात जाईन. ज्यांच्या दबावामुळे हे गुन्हे मागे घेतले जातील, त्या सर्वांना मी प्रतिवादी करून न्यायालयात उभे करणार.” त्यांनी इतर सर्व आंदोलनांतील गुन्हे मागे घेण्याची मागणी करत, मराठा आंदोलकांना विशेष वागणूक देणं चुकीचं असल्याचे सांगितले. सदावर्ते यांचा हा इशारा मराठा समाजात आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारा आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!