Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Rohit Pawar : माजलंय सरकार… माज उतरवण्याची वेळ आलीये; रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

Rohit Pawar : माजलंय सरकार… माज उतरवण्याची वेळ आलीये; रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

Rohit Pawar On Corrupt Ministers : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) ने आज (१५ सप्टेंबर) नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी भव्य मोर्चा काढला असून, या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर भ्रष्टाचार, खाजगीकरण आणि अहंकाराच्या मुद्द्यावर तीव्र टीका केली. “माजलंय सरकार… त्यांचा माज उतरवण्याची वेळ आलीये, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

नाशिकमधील आदिवासी आयुक्तालयासमोर बसलेल्या आंदोलकांची भेट घेतल्यानंतर पवार यांनी हे वक्तव्य केले, ज्याने सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा मोर्चा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीचा भाग असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने शेतकरी आणि आदिवासी मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, कांद्याच्या किंमती, पिक विमा, ऊस उत्पादकांच्या समस्या, अवकाळी पाऊस आणि पूर यांसारख्या मुद्द्यांसाठी मोर्चा काढला. या मोर्चात सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, जयंत पाटील आणि रोहित पवार यांसारखे प्रमुख नेते सहभागी झाले.

शरद पवार यांच्या १४ आणि १५ सप्टेंबरच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला असून, पक्षाने ५० हजार शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याचे नियोजन केले होते. रोहित पवार यांनी मोर्चापूर्वी आदिवासी आंदोलकांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या ऐकल्या. हे आंदोलन स्थानिक निवडणुकांसाठी पक्षाची जमलीभूत करणारे ठरले असून, महायुती सरकारला शेतकरी आणि आदिवासींच्या न्यायाची मागणी करण्यात आली.

१० हजार कोटींची कामे भाजपाच्या ठेकेदारांना

रोहित पवार यांनी भाजप सरकारच्या खाजगीकरण धोरणावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, “भाजप सरकारचा खाजगीकरणाकडे कल आहे. १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तची कामे ठेकेदारांना देण्यात आली आहेत. यातील बहुतेक कॉन्ट्रॅक्टर भाजपाच्या विचारांचे आहेत. नेत्यांना फायदा व्हावा म्हणून सरकारी भरती बंद करून ठेकेदारांमार्फत भरती सुरू केली आहे.

आदिवासी विभागात खाजगीकरण नको.” नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी तयारीच्या नावाखाली गुजरात आणि तेलंगणातील ठेकेदारांना कामे देण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पवार यांनी सांगितले की, पक्ष विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा मांडणार आहे. या टीकेने नाशिकमधील स्थानिक ठेकेदार आणि आदिवासी समाजात समर्थन मिळवले असून, खाजगीकरणामुळे स्थानिक रोजगारावर परिणाम होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!