Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

रायगडमध्ये राजकीय भूंकप! सुनील तटकरे भाजपात जाणार? शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा दावा

रायगडमध्ये राजकीय भूंकप! सुनील तटकरे भाजपात जाणार? शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा दावा

रायगड: रायगडच्या राजकारणात नव्या कलाटणीची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा सनसनाटी दावा शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी केला आहे. आधीच पालकमंत्रिपदावरून तटकरे आणि शिवसेनेतील संघर्ष तीव्र असताना या वक्तव्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. दळवी यांनी तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करताना म्हटले की, “तटकरे कोणाशीही एकनिष्ठ राहिले नाहीत. ज्यांच्यासोबत त्यांनी काम केले, त्यांनाच फसवण्याचे काम त्यांनी केलं आहे.  त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास चिटिंगवर आधारित आहे. आता त्यांची पावले भाजपकडे वळत आहेत आणि ते लवकरच भाजपमध्ये जाणार हे निश्चित आहे.”

दळवी यांनी तटकरे कुटुंबावर वैयक्तिक स्वरूपात टोलेबाजी करत म्हटलं की,, त्यांनी ज्यांनी उभं केलं त्यांनाच धक्का देणं ही त्यांची शैली आहे. रात्री ९ नंतर तटकरे कुटुंब फोन बंद करतात. त्यांना कोणाची पर्वा नसते. बॅगा भरून दिल्लीला जाणं ही त्यांची सवय झाली आहे, असा घणाघातही यावेळी दळवी यांनी केला. नाव न घेता त्यांनी आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांच्यावरही टीका केली. काही लोक सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येतात,” असा त्यांनी टोलाही लगावला.

हेही वाचा – शरद पवारांना मोठा धक्का! देशमुखांचा अचानक राजीनामा; आता कोणाला देणार साथ?

शिवसेना तटकऱ्यांच्या विरोधात एकत्र?

रायगडमधील राजकारणात शिवसेना शिंदे गट तटकऱ्यांचा विरोध करण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. पालकमंत्रिपदावरून तटकरे विरुद्ध गोगावले असा वाद आधीच पेटलेला असताना, दळवींच्या सततच्या आरोपांमुळे दोन्ही बाजूंतील संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना या आरोप–प्रत्यारोपांना आणखी वेग येईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे. दरम्यान, दळवी यांनी केलेल्या आरोपांवर खासदार सुनील तटकरे काय प्रतिक्रिया देतात, याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!