Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ..! कर्जमाफीचा नाद असल्याने आम्ही निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो, सहकारमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ..! कर्जमाफीचा नाद असल्याने आम्ही निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो, सहकारमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

Babasaheb Patil Controversial Statement: राज्यात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक भागात ओला दुष्काळ पडला आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांकडून कर्जमाफी, दुष्काळ जाहीर करण्याच्या मागण्या जोर धरू लागल्या आहेत. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने आठवत शेतकरी सरकारकडे आपला रोष व्यक्त करत आहेत, तर विरोधकांकडूनही सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी मदतीच्या घोषणाही होत असताना, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी चोपडा येथील दीपज बँकेच्या शाखा उद्घाटन कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे नवा वाद उफाळला आहे. बाबासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे की, ‘लोकांनी काय मागायचं ते आधी ठरवावं. लोकांना कर्जमाफीचा नाद आहे. त्यामुळे निवडणुकीत लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही आश्वासने देतो.’ त्यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

हेही वाचा – Chandrapur: चंद्रपूर हादरले! जमीन फसवणुकीच्या वादातून शेतकऱ्याची तहसील कार्यालयात आत्महत्या; खासदार धानोरकरांवर कुटुंबीयांचा गंभीर आरोप

यावर प्रतिक्रिया देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले, बाबासाहेब पाटील हे लातूरसारख्या दुष्काळी भागातून आलेले मंत्री आहेत. शेतकऱ्यांचा कर्जबाजारी होण्यामागे सरकारच्या धोरणांचा परिणाम आहे. जे मंत्री कर्जमाफीला नाद लागला असे बोलत आहेत, ते निर्लज्जपणाचे कळस आहे. शेतकऱ्यांची थट्टा करण्याऐवजी त्यांनी वास्तविक परिस्थिती समजून घेतली पाहिजे.

हेही वाचा – मोठी बातमी! पूरग्रस्तांसाठी सरकारकडून 31 हजार 628 कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर; शेतकऱ्यांना काय-काय मिळणार?

राजू शेट्टी यांनी हे देखील सांगितले की, जबाबदार मंत्र्यांनी केंद्र सरकारकडे जाऊन शेतकऱ्यांचे कर्ज वाढण्यामागचे धोरण स्पष्ट करावे, असे अपेक्षित आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण तापले असून, शेतकरी वर्गाचे रोष आणि विरोधकांचा दबाव सरकारवर वाढला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!