Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अनुकंपा उमेदवारांची प्रतीक्षा संपली! राज्यातील 10 हजारांहून अधिक तरुणांना मिळणार सरकारी नोकरी

अनुकंपा उमेदवारांची प्रतीक्षा संपली! राज्यातील 10 हजारांहून अधिक तरुणांना मिळणार सरकारी नोकरी

पुणे: सरकारी नोकरी मिळविण्याचे स्वप्न अनेकांच्या डोळ्यात असते. पण शिपाई असो वा अधिकारी पद, एका जागेसाठी हजारो अर्जदारांची स्पर्धा असते. विशेषतः एमपीएससीच्या परीक्षेत ही तीव्र चुरस दिसून येते. त्यातच, उमेदवारांना अनुकंपा नियुक्त्यांसाठीही अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र, अखेर ही प्रतिक्षा संपली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे अनेक वर्षांपासून रखडलेली प्रकरणे मार्गी लागली आहेत. येत्या 4 ऑक्टोबर रोजी 5187 अनुकंपा उमेदवारांना आणि 5122 एमपीएससी परीक्षेतून निवड झालेल्यांना नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. म्हणजेच, एकाच दिवशी 10,309 तरुणांना शासकीय सेवेत प्रवेश मिळणार आहे. राज्यात यापूर्वी असा उपक्रम झालेला नाही.

हेही वाचा – जिल्हा परिषद शिक्षकातून ‘केंद्र प्रमुख’ पदांवर नियुक्तीसाठी डिसेंबरमध्ये ऑनलाईन परीक्षा

अनुकंपा तत्त्वानुसार सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना नोकरीची संधी दिली जाते. मात्र तांत्रिक कारणांमुळे अनेक अर्ज प्रलंबित होते. फडणवीस यांनी या संवेदनशील प्रश्नाला प्राधान्य देत सामान्य प्रशासन विभागाला थेट निर्देश दिले. त्यानंतर नवीन धोरण तयार करण्यात आले आणि नियुक्ती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला.

हेही वाचा – CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर

या निर्णयामुळे केवळ शासकीय कुटुंबीयांनाच दिलासा मिळणार नाही, तर राज्यातील युवकांसाठीही मोठी संधी उपलब्ध झाली आहे. विभागनिहाय पाहता कोकणातील 3078 उमेदवारांची संख्या सर्वाधिक असून, त्यापाठोपाठ विदर्भातील 2597, मराठवाड्यातील 1710, पुणे विभागातील 1674 आणि नाशिक विभागातील 1250 उमेदवारांचा समावेश आहे. हा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 100 आणि 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा उपक्रमातील एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!