Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘धनंजय मुंडे इतका नीच माणूस…’; वाल्मिक कराडची आठवण काढल्यानंतर धनंजय मुंडेंवर जरांगेंचा निशाणा

‘धनंजय मुंडे इतका नीच माणूस…’; वाल्मिक कराडची आठवण काढल्यानंतर धनंजय मुंडेंवर जरांगेंचा निशाणा

Manoj Jarange on Dhananjay Munde: परळी येथे घेतलेल्या प्रचारसभेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा उल्लेख करताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. आज आमच्यातील एक माणूस इथे नाही, त्याची कमतरता जाणवते, असे मुंडेंनी भाषणात म्हटल्याचे समोर आल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. या विधानावर मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. जरांगे म्हणाले, ‘धनंजय मुंडेंनी अशी भाषणे केली असतील तर त्यांच्यासारखा नीच माणून दुसरा कोणी नाही. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱ्या व्यक्तीची उणीव भासते, असे म्हणणे म्हणजे धन्या इतका नीच माणूस या पृथ्वीतलावर असूच शकत नाही.

जरांगे पुढे म्हणाले की, ‘अजित पवार यांनी तरी आता डोळे उघडावेत. मुंडेंना किती दिवस पाठीशी घालणार? गरीबांच्या जिवाशी खेळणाऱ्यांना सत्ताधारी किती प्रोत्साहन देणार? असा सवालही यावेळी जरांगे यांनी केला. जरांगे पाटील यांनी आपल्या प्रतिक्रियेत कराडवरही गंभीर आरोप केले. गुंडगिरी, जमिनी बळकावणे, तरुणांना चुकीच्या प्रवृत्तीकडे ढकलणे, लोकांना ब्लॅकमेल करून सत्ता वाढवणे… अशा अनेक गैरप्रकारांत तो गुंतलेला होता. अशा व्यक्तीवर आधार ठेवून राजकारण उभे करणारे धनंजय मुंडे जनतेसाठी हितकारक असू शकत नाहीत, असे ते म्हणाले.

हेही वाचा – परळीच्या प्रचारसभेत धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराडची आठवण; म्हणाले, ‘माझा सहकारी आज…’

दरम्यान, त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही लक्ष्य केले. आता तरी दोन्ही नेत्यांनी डोळे उघडले पाहिजेत. अन्यथा मुंडे यांच्या पापात तुम्हीही सापडाल, असा इशाराही त्यांनी दिला. याचबरोबर, अशा गुंडांना संरक्षण देणारी व्यवस्था लोकशाहीला धक्का देणारी आहे. सरकारने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी जरांगेंनी केली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!