मुंबई : ‘बिग बॉस’च्या घरात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच सलमान खानने घरातील अनेक सदस्यांना फटकारले. पण अमल मलिकला सर्वात कडक शब्दांत खडसावले. अमलला समजावून सांगताना सलमानने स्वतःचा जुना आणि कठीण आठवला. एकेकाळी त्याच्यावरही अनेक गंभीर आरोप लावण्यात आले होते, ज्याची तो अजूनही किंमत चुकवत असल्याचे त्याने म्हटले आहे.
अमलला समजावून सांगताना सलमानने त्याला त्याच्या वैयक्तिक अनुभवातून सांगितले की, जग फक्त तुमच्या प्रतिक्रिया लक्षात ठेवते. त्याचे स्वतःचे उदाहरण देत सलमानने अमलला अजूनही त्याने कधीही न केलेल्या गोष्टींसाठीच दोषी ठरत आहे. दबंग खानने अमलला सांगितले, ‘कोणी काहीही म्हटले तरी प्रतिक्रिया देऊ नका. मला माहित आहे की, मी अजूनही ३० वर्षांपूर्वीच्या कथित प्रकरणांमुळे त्रस्त आहे.
सलमान पुढे म्हणाला, “मी न केलेल्या गोष्टीही माझ्यावर लादल्या जातात आणि मी अजूनही त्या गोष्टींमुळे दुःख भोगत आहे. लोक काहीही म्हणोत तरी प्रतिक्रिया न देण्याची मानसिक ताकद तुमच्यात आहे का?’
तसेच, जर तुम्ही दान केले तर ते एक दिखावा मानले जाते, जर तुम्ही आदर दाखवला तर ते एक दिखावा मानले जाते. त्याने ते नक्कीच केले असेल…त्याने ते नक्कीच केले असेल…अशी एकप्रकारे मानसिकताच बनते. त्यामुळे दुसऱ्या विचारांकडे लक्ष न देणेच फायद्याचे ठरू शकते.


