Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अंबरनाथमध्ये भाजपची फोडाफोडी अयशस्वी! शिंदे सेना अन् अजित पवारांची हातमिळवणी; सत्तेचं समीकरण पुन्हा पालटलं

अंबरनाथमध्ये भाजपची फोडाफोडी अयशस्वी! शिंदे सेना अन् अजित पवारांची हातमिळवणी; सत्तेचं समीकरण पुन्हा पालटलं

Ambernath Municipal Election 2026: अंबरनाथ नगरपालिकेच्या सत्तेसाठी सुरू असलेल्या हायव्होल्टेज ड्रामामध्ये आता नवीन वळण आले आहे. काँग्रेसचे १० नगरसेवक फोडून बहुमताचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी चाणक्य नीती वापरत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सत्तेचा दावा ठोकला असून, भाजपची मोठी कोंडी केली आहे.

भाजपची खेळी आणि शिंदेंचा पलटवार

अंबरनाथमध्ये १६ जागा जिंकणाऱ्या भाजपने सुरुवातीला काँग्रेसच्या १० फुटीर नगरसेवकांना आपल्या गोटात खेचले होते. याद्वारे शिवसेनेला (शिंदे गट) सत्तेपासून दूर ठेवण्याचा भाजपचा मनसुबा होता. मात्र, अंबरनाथ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांनी तातडीने सूत्रे हलवली. शिवसेनेचे २७ नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे ४ नगरसेवक यांची वज्रमूठ बांधून त्यांनी बहुमताचा ३२ चा आकडा गाठला आहे.

हेही वाचा – BJP vs Shinde Sena: महायुतीत मिठाचा खडा! मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा

भाजपच्या हालचाली लक्षात घेता, शिवसेनेने आपल्या सर्व नगरसेवकांना ठाण्यातील आनंद आश्रमात एकत्र केले. तेथे झालेल्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४ नगरसेवकांनी आणि एका अपक्ष उमेदवाराने शिवसेनेला पाठिंबा दर्शवला. या पाठिंब्याचे अधिकृत पत्र घेऊन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सत्तास्थापनेचा दावा सादर केला आहे.

१० नगरसेवक भाजपच्या वाटेवर

दुसरीकडे, काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. १२ पैकी १० नगरसेवकांनी पक्षादेश झुगारून भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसच्या स्थानिक अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, शिवसेनेने राष्ट्रवादीला सोबत घेतल्यामुळे भाजपच्या या फोडाफोडीच्या राजकारणाला सध्यातरी अंबरनाथमध्ये लगाम लागल्याचे दिसत आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!