Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘अनंत गर्जेंशी अनैतिक संबंध असणारी ती महिला खरी गुन्हेगार…’; रुपाली ठोंबरेंचा दावा

‘अनंत गर्जेंशी अनैतिक संबंध असणारी ती महिला खरी गुन्हेगार…’; रुपाली ठोंबरेंचा दावा

पुणे: भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीए म्हणून कार्यरत असलेल्या अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी शनिवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेनंतर गौरींना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गर्जे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. रविवारी मध्यरात्री गर्जे यांना अटक करून पोलिसांनी कोठडीत ठेवले. रविवारी मोहोज देवढे येथे गौरींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भावनिक वातावरणात गौरींचे वडील ओक्साबोक्शी रडत न्यायासाठी आक्रोश करताना पाहून उपस्थित सर्वजण हळहळले.

रुपाली पाटील ठोंबरे यांची प्रतिक्रिया

या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं की, डॉ. गौरी यांच्या वडिलांचा आक्रोश पाहून मन हेलावून गेले. नवऱ्याच्या अनैतिक संबंधांमुळे घरात वाद होत होते, हे गंभीर आहे. अनैतिक संबंध ठेवणारी महिला देखील गुन्ह्यात आरोपी केली पाहिजे. ती देखील मोकोट राहता कामा नये, असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – ‘गौरीच्या घरच्यांना अनंतच्या जुन्या संबंधांविषयी…’; अनंत गर्जेच्या वकिलांचा कोर्टात धक्कादायक दावा

रुपाली ठोंबरे यांनी पुढे म्हटलं आहे की, ‘घरातील माणसाने आत्महत्या केल्यावर हे कळण्यापेक्षा, आधीच घरातील लोकांनी संवाद, समन्वय असणे फार फार महत्त्वाचे आहे. मुळामध्ये मुलींना सक्षम बनून त्यांची मानसिक स्थिती ही माहेरचे किंवा सासरचे दोघांकडे एक समंजसपणाचे वागणे हे फार महत्त्वाचे आहे. डॉक्टर जरी असली तरी त्या सिच्युएशनला या नवरा बायकोच्या भांडणांमध्ये नवऱ्याचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर यावरुन झालेले वाद हे फार महत्त्वाचे आहेत. नवऱ्यावर, सासूवर तसेच नणंद यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. त्याचप्रमाणे जिच्या सोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं, त्या महिलेला सुद्धा गुन्ह्यात आरोपी करणे गरजेचे महत्वाचे आहे, अशी भूमिका देखील रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये मांडली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!