Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

20 डिसेंबरला ‘या’ 5 शहरांमध्ये सार्वजनिक सुट्टी! नगरपरिषद निवडणुकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

20 डिसेंबरला ‘या’ 5 शहरांमध्ये सार्वजनिक सुट्टी! नगरपरिषद निवडणुकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

Pune Municipal Council Election: पुणे जिल्ह्यातील पाच महत्त्वाच्या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. येत्या 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी मतदारांना आपला हक्क बजावता यावा, यासाठी संपूर्ण मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश प्रसिद्ध केले आहेत.

‘या’ नगरपरिषदांमध्ये असेल सुट्टी

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, खालील पाच शहरांच्या कार्यक्षेत्रात सुट्टी लागू असेल: १. बारामती २. दौंड ३. लोणावळा ४. तळेगाव दाभाडे ५. फुरसुंगी-उरुळी देवाची

हेही वाचा – पुणे महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांची स्पष्ट भूमिका

बँका, सरकारी कार्यालये आणि खासगी संस्थांनाही आदेश

मतदान प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी ही सुट्टी व्यापक स्वरूपात लागू करण्यात आली आहे. सर्व राज्य व केंद्र सरकारी कार्यालये, महामंडळे आणि मंडळांना सुट्टी अनिवार्य असेल. तसेच सर्व सार्वजनिक उपक्रम आणि बँकांनाही २० डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जे मतदार या मतदारसंघातील रहिवासी आहेत, मात्र कामानिमित्त बाहेर आहेत, त्यांनाही मतदानासाठी ही सुट्टी लागू राहील.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि लोकशाहीचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क न विसरता बजावण्याचे आवाहन केले आहे. संबंधित विभागांनी सुट्टीबाबतच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!